एक Missing Case
एक Missing Case
बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, तेंव्हा मी नुकतंच Professional Astrology Consultation सुरु केलं होतं. माझे एक Client दिल्लीला राहत होते, नवरा बायको, एक मुलगा एक मुलगी, चौकोनी कुटुंब ! एके दिवशी त्यांचा मुलगा संध्याकाळी खाली खेळायला गेला आणि रात्र झाली तरी परत आला नाही. सगळीकडे शोधाशोध सुरु झाली, मुलाचे बिल्डींग मधले मित्र, शाळेतले मित्र, सगळीकडे चौकशी करून झाली, पण मुलाचा काहीच पत्ता नव्हता ! अचानक मुलगा केला कुठे, काय झाल असेल ह्या विचाराने आईवडील हैराण झाले. त्यांनी त्यांच्या पुण्याच्या एक नातेवाईकाला माझी Appointment घ्येयला सांगितलं. मी पत्रिका बघितली तर त्या वेळेचा time period म्हणजेच अंतर्दशा मुलाच्या जीवाला धोका दाखवत नव्हती, म्हणजे मुलगा सुखरूप होता पण त्याच वेळेला त्याची पत्रिका या घडलेल्या घटनेचा त्याच्या वडिलांशी काहीतरी संबंध दाखवीत होती………………. पण नेमकं काय?……… म्हणून मी त्यांना विचारलं कि मुलाच्या वडिलांचं कोणाशी काही भांडण वैगरे झालाय का?, Office मधे किंवा आणखी कुठे? पण तसं काहीच नाही अस ते म्हणाले, म्हणजे अपहरणाची शक्यता कमी होती. त्याच वेळेला त्याच्या पत्रिकेत मंगळाचा देखील Strong संबंध होता. ज्या दिवशी मी हे बघत होतो त्या दिवशी सोमवार होता म्हणजे दुसऱ्या दिवशी मंगळवार होता, म्हणून मी त्यांना म्हंटल कि उद्या तुम्हाला या मुलाचा ठावठिकाणा कळेल किंवा मुलगा परत येईल पण उद्यापर्यंत काही माहित होईल असं वाटत नाही.
सोमवारी काही माहित होऊ शकणार नाही हे कळल्यावर ते थोडे निराश झाले पण शोधाशोध सुरु ठेवली. सोमवारची सगळी रात्र नातेवाईक आणि इतर सगळ्यांनी शोधाशोध करण्यात घालवली. सोमवारची रात्र संपून मंगळवारची पहाट झाली.. त्यांचा एक नातेवाईक अशीच शोधशोध करत करत पहाटे दिल्लीच्या जुन्या रेल्वे स्टेशनवर पोचला आणि अचानक बाकावर बसलेला तो मुलगा त्यांना समोर दिसला. त्यांनी लगेच घरी कळवलं आणि सगळ्यांना हायसं वाटलं…. पण आता प्रश्न होता कि हा मुलगा एकटा तिकडे काय करत होता, मुळात घरापासून इतका लांब गेलाच कशासाठी? कारण काय?…………. तो घरी येउन वातावरण शांत झाल्यावर त्या मुलाने सांगितलं कि तो ज्या क्लासला जात होता तिकडे थोडेच दिवसापूर्वी परीक्षा झाली होती आणि त्याच दिवशी त्याचा Result लागला होता पण Marks कमी पडले होते आणि संध्याकाळी घरी आल्यावर वडिलांना हे समजलं तर ते ओरडतील , मारतील, ह्या भीतीने ते टाळण्यासाठी तो संध्याकाळीच घर सोडून गेला होता………… अशा प्रकारे ह्या घटनेशी वडिलांचा नेमका काय संबंध होता हे आता सगळ्यांनाच कळलं होतं !
अभय गोडसे
No comments:
Post a Comment