Tuesday 20 February 2018

पुन्हा तीच चूक..



वैवाहिक आयुष्याबद्दलच्या समस्या घेऊन येणारे clients देखील बरेच आहेत. प्रशांत (नाव बदललं आहे) देखील त्याच समस्येसाठी माझ्याकडे आला होता. त्याची आणि त्याच्या बायकोची पत्रिका बघितली. त्याच्या बायकोची पत्रिका प्रशांतच्या पत्रिकेपेक्षा संसारसुखासाठी फारच वाईट होती. इथे एक मुद्दा सांगावासा वाटतो कि "संसारसुख मिळेल का?" ह्या प्रश्नाच उत्तर देण्यासाठी नेहमीच नवरा आणि बायको, दोघांच्याही पत्रिका तपासाव्या लागतात कारण ते एकटयाच्या पत्रिकेवर कधीच अवलंबून असत नाही.  इथे बायकोची पत्रिका संसारसुखाच्या दृष्टीने फारच वाईट होती त्यामुळे बायकोच्या पत्रिकेमुळे सगळा प्रॉब्लेम झालेला होता. प्रशांतची पत्रिका तिच्यापेक्षा संसारसुखासाठी बरीच बरी होती. प्रशांतला म्हंटलं कि पुढच्या काही वर्षांचा कालावधी बघितला असता परिस्थितीत काहीच सुधारणा दिसत नाही, उलट आताचा काळ आणि पुढचे सहा महिने फारच वाईट आहेत, खरं सांगायचं झालं तर १००% घटस्फोट होण्याच्या indications आहेत. माझं बोलणं ऐकून प्रशांतची खात्रीच झाल्यासारखं वाटलं. तो म्हणाला "तुम्ही सांगताय अगदी तशीच परिस्थिती आत्ता आहे. घटस्फोटची प्रक्रिया कधीच सुरु झाली आहे आणि आता कोर्टाच्या एक दोन शेवटच्या तारखा आहेत, घटस्फोट निश्चित आहे". मी त्याला दिलासा देत म्हंटलं "एका अर्थी चांगलंच आहे कारण तुमची पत्रिका तुमच्या बायकोपेक्षा संसारसुखासाठी चांगली आहे. Remarriage च्या वेळेस पत्रिका चांगल्या असलेल्या एखाद्या मुलीशी लग्नं झालं तर निदान पुढे संसार सुखाचा तरी होईल" . 

थोडे दिवस गेले असतील, प्रशांत पुन्हा एकदा अपॉइंटमेंट घेऊन भेटायला आला. बसल्या बसल्या म्हणाला "सर, तुम्ही सांगितल्या प्रमाणे माझा घटस्फोट झाला पण तरीही अजून माझी बायको माझ्या टच मधे आहे आणि ती मला आम्ही परत एकत्र यावं असं सतत सुचवतं असते. मी द्विधा मनस्थितीत आहे, काय करावं कळत नाही ". हे ऐकून मी त्याला बजावलं "अजिबात नाही ! तुझ्या बायकोच्या पत्रिकेतील संसारसुखासाठी वाईट असलेला काळ अजूनही सुरु आहे आणि पुढची बरीच वर्ष आहे. तीच चूक पुन्हा केलीस तर परत पस्तावशील. तिच्याशी पुनर्विवाहाचा विचार अजिबात करू नकोस. हां, जर तिचा पुढील काळ हा संसारसुखासाठी चांगला असता तर मी तुला अजिबात अडवलं नसतं. पण इथे परिस्थिती वेगळी आहे. एकदा फसला आहेस, पुन्हा नको ! ". "ठीक आहे" असं म्हणून प्रशांत गेला. 

साधारण वर्षभराचा काळं लोटला असेल. पुन्हा एकदा प्रशांत अपॉइंटमेंट घेऊन आला. आतातरी ह्याने एखाद्या चांगल्या मुलीशी पुनर्विवाह केला असावा असा मी विचार करत असतानाच, प्रशांत म्हणाला "सॉरी सर". "कशाबद्दल?" मी आश्चर्याने म्हंटलं. प्रशांत म्हणाला "सर मी परत तीच चूक केलीय ! मी माझ्या आधीच्याच बायकोशी पुनर्विवाह केलाय". मी कपाळावर हात मारला "अरे, मी मागच्या वेळेला एवढं सगळं सांगून सुद्धा तू परत तीच घोडचूक केलीस?". प्रशांत "हो सर, मी तिच्या गोड बोलण्याला फसलो आणि परत लग्न करायला तयार झालो. तिने परत त्रास देयला सुरुवात केलीय. आमचं अजिबात पटत नाहीये. रोज नवीन डोकेदुखी असते. मला कंपनीकडून US ला जाण्याचा चान्स आलाय पण मी परदेशात जाऊ नये म्हणून माझ्या बायकोने माझा पासपोर्ट देखील मुद्दामहून गहाळ केलाय, परत तोच सगळा मनस्ताप सुरु झालाय सर. आता पुढे काय?"  मी म्हंटलं " आता काय, परत ये रे माझ्या मागल्या, परत घटस्फोट, परत कोर्टाच्या चकरा, परत मनस्ताप ! ". ह्या वेळेला प्रशांत पुरता कोलमडून गेला होता पण सत्य सांगण्यापलीकडे माझ्या हातात काहीच नव्हतं ! 

ज्योतिषी हा फक्त मार्गदर्शक असतो, पुढे काय वाढून ठेवलंय हे सांगून, 'पुन्हा तीच चूक' न करण्याचा संदेश जातकाला देऊ शकतो पण त्याच नशीब लिहू किंवा बदलू शकत नाही !

अभय गोडसे,
For Consultation, visit KPJyotish.com or AbhayGodse.com


No comments:

Post a Comment

माणसं वाचताना..

2003 पासून Astrology consultation करत असल्यामुळे, वाचनाची आवड नसली तरी, माणसं वाचायची सवय लागली आहे. ह्यासंबधीच हा एक किस्सा... 2018 मधे आमच...